Wednesday, July 23, 2008

आजची शिक्षण पद्धति आणि परीक्षा पद्धति

आजची शिक्षण पद्धति आणि परीक्षा पद्धति योग्य आहे का? विद्यार्थी वर्षभर जे शिकतो ते फक्त तीन तासात आजमावने कितपत बरोबर आहे? या शिक्षणाचा कदाचित मानुस प्रगल्भ व्हायला उपयोग होत असेल । पण करियर मध्ये त्याचा उपयोग कितपत होतो या बद्धल मला तरी शंकाच आहे। व्यवासयभिमुख शिक्षण मुलाना कधी मिळणार? मुलांचे आणि पर्यायाने देशाचे चांगले भविष्य घदवायाचे असेल तर संपूर्ण शिक्षण पद्धति बदलावी लागेल । सर्वानी यावर विचार करणे आवश्यक आहे।

Tuesday, July 22, 2008

आजचे राजकारण आणि आमचे पुढारी

आज संसदेमधे जे काही घडले ते पाहून मान शरमेने खाली गेली । प्रथमच आपण भारतीय असल्याची लाज वाटली। ख़रच आपल्याला सर्व खासदाराना परत बोलवायचा अधिकार पाहिजे। संसदेमध्ये सर्वांसमोर पैशांची बंडले दाखवली जातात , पैसे दिल्याचा पुरावा म्हणुन सीडी दाखवली जाते। तरीपण एकही खासदार किवा अगदी पंतप्रधान सुद्धा याबाबत सीरियस दिसत नाहित। सर्वाना फक्त कालजी असते ती खुर्चीची। सत्ताधारी आणि विरोधक दोघानाही फक्त राजकारणात रस। देशाची चिंता कोणालाही नाही। आता या देशाला गरज आहे ती एका क्रांतीची । कारण या देशात राजकारान्यान्बरोबर लोकही मुर्दाड झालेत । एखादी क्रान्तिच आता या देशाला वाचवू शकेल ।